रामकुंडात युवक वाहून गेल्याने आईने फोडला टाहो, सुदैवाने बचावली चिमुकली

Published : Aug 04, 2024, 04:06 PM ISTUpdated : Aug 04, 2024, 04:09 PM IST
nashik rain update

सार

Nashik Rain Update : नाशिकमधील रामकुंड परिसरातून 29 वर्षीय युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखत युवक वाहून गेल्याने आईने टाहो फोडला.

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसाने आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रामकुंड परिसरातून 29 वर्षीय युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखतच युवक वाहून गेल्याने आईने टाहो फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तर एका तीन वर्षीय मुलीला वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे.

गंगापूर धरणातून रविवारी दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले आहे. तर रविवारी दुपारी 3 वाजता एकूण 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विसर्गामुळे

पुराच्या पाण्यात 29 वर्षीय युवक गेला वाहून

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीपात्रात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रामकुंड येथे 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 29 वर्षीय पर्यटकाला शोधण्यासाठी प्रशासनाचे शोध कार्य सुरू आहे. तर तीन वर्षाची मुलगीदेखील पाण्यात पडली होती. मात्र, तिला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले आहे.

नागरिकांनी सतर्क राहत गरज असेल तरच घराबाहेर पडावे : दादा भुसे

राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. नदी काठावरील नागरिकांनी पुराची पातळी लक्षात घेवून आपले पाळीव प्राण्यांची देखील सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वोतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सरकारी यंत्रणा फिल्डवर आहेच मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

नाशिकला रविवारी ऑरेंज अलर्ट

दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे, तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

पुण्यात पुन्हा पूरस्थिती, खडकवासला धरण 65% खाली करा; अजित पवार यांच्या सूचना

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर