मदतीच्या रकमेत कोणताही बदल नाही
निवडणुकीच्या काळात या योजनेतील मदत रक्कम वार्षिक ₹१५,००० करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत ही रक्कम वाढवली गेलेली नाही. योजना पूर्ववतच असून, शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२,००० मिळतील. यामध्ये ₹६,००० केंद्र सरकारकडून आणि ₹६,००० राज्य सरकारकडून दिले जातात.
तथापि, योजनेतील काही निधी ‘कृषी समृद्धी योजना’ अंतर्गत वळवण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश कृषी पायाभूत सुविधांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणे आहे. त्यामुळेच यंदा मदतीच्या रकमेत वाढ झाली नाही.