रेल्वेच्या आकडेवारीनुसार, एका फाटकामुळे गाडीला साधारण ८ ते १० मिनिटांचा उशीर होतो. १० फाटकं बंद झाल्यामुळे मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या आणि कर्जत-खोपोली लोकलच्या वेळेत मोठी बचत होईल.
वेगवान प्रवास: वारंवार ब्रेक लावण्याची कटकट संपणार.
वेळेची बचत: कर्जत-खोपोली लोकल आता 'राईट टाईम' धावणार.
सुरक्षेला प्राधान्य: फाटकांवरील मानवी हस्तक्षेप संपल्याने अपघातांचे प्रमाण शून्यावर येईल.
इंधनाची बचत: गाड्यांचा वेग कायम राहिल्याने रेल्वेच्या ऊर्जा वापरातही बचत होईल.