पुणे, पिंपरी-चिंचवडसह सांगली आणि सोलापूरमधील ४,१६८ घरांसाठी म्हाडाने अर्ज मागवले होते. या घरांसाठी तब्बल २ लाख १५ हजार ८४७ अर्जांचा पाऊस पडला. सुरुवातीला ११ डिसेंबरला होणारी ही सोडत अर्जांच्या पडताळणीमुळे १६-१७ डिसेंबरपर्यंत पुढे गेली. मात्र, दरम्यानच्या काळात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.