बीडमध्ये झालेल्या या सभेत मनोज जरांगे यांनी काही कठोर भूमिका मांडल्या. त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजावर आलेले संकट शांततेच्या मार्गाने दूर केले जाईल. सभेमध्ये डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादावर त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, "आज आमच्या सभेला डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कोणाच्याही सभेला डीजे वाजणार नाही." सत्ता कायम नसते, ती बदलत असते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा थेट इशाराही त्यांनी दिला. ही शेवटची लढाई असून, ती आरक्षणाशिवाय थांबणार नाही, असेही ते म्हणाले.