महत्वाचं म्हणजे, अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांनाही या महिन्याचा हप्ता मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, लाभार्थींना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली आहे.
या मुदतीत ई-केवायसी न केल्यास भविष्यातील हप्त्यांसाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व महिलांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.