शेतकऱ्यांसाठी महावितरणचा सर्वात मोठा निर्णय! 'हे' नवीन धोरण तुमचं आयुष्य बदलणार!

Published : Dec 01, 2025, 02:06 PM IST

MSEDCL Solar Power For Farmers : महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित भव्य प्रकल्प सुरू केला. राज्यभरात ५१२ सौर प्रकल्प कार्यान्वित झाल्याने पारंपरिक वीज जाळ्यावरील अवलंबित्व कमी होऊन शेतकऱ्यांना स्थिर वीजपुरवठा मिळतोय. 

PREV
16
शेतकऱ्यांसाठी महावितरणची नवी ऊर्जा क्रांती!

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा विश्वसनीय, अखंड आणि स्थिर वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणने सौरऊर्जेवर आधारित भव्य प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. पारंपरिक लाईनवरील ताण आणि बिघाड कमी करण्यासाठी अनेक ठिकाणचे जुने विद्युत खांब-आधारित जाळे टप्प्याटप्प्याने बंद केले जात आहे. त्याऐवजी, शाश्वत आणि किफायतशीर पर्याय म्हणून सौरऊर्जेला निर्णायक प्राधान्य देण्यात येत आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, वाढती मागणी, अनियमित पुरवठ्याच्या तक्रारी आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यावर तोडगा म्हणून हे धोरण तातडीने राबविण्यात येत आहे. 

26
सौरऊर्जा प्रकल्पांचा विक्रमी विस्तार

महावितरणने राज्यभर 2,773 मेगावॉट क्षमतेचे तब्बल 512 सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले असून, यामुळे ग्रामीण भागातील लाखो कृषिपंपांना दिवसा स्वच्छ आणि अखंड वीज मिळत आहे. दीर्घकालीन वीजखरेदी करारातही महावितरणने अक्षय ऊर्जेला मोठी चालना दिली असून, 65% पर्यंत सौर व अन्य नूतन ऊर्जा स्रोतांना प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या 72,918 मेगावॉट क्षमतेच्या एकूण वीजखरेदी करारांमध्ये अक्षय ऊर्जेचा मोठा वाटा निश्चित करण्यात आला आहे. 

36
हा निर्णय का महत्त्वाचा?

अधीक्षक अभियंता अमित बोकिल यांच्या मते, “ऊर्जा परिवर्तनाच्या दिशेने महावितरणने सौरऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक पावले उचलली आहेत. सुरू असलेल्या 512 सौर प्रकल्पांमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.” महाराष्ट्र आज देशातील 60% सौर कृषिपंप असलेले अग्रगण्य राज्य ठरले आहे. सध्या 6 लाख 47 हजार सौर कृषिपंप कार्यरत असून, शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत स्थिर आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळत आहे. 

46
भारनियमनाशिवाय विक्रमी वीजपुरवठा

राज्यात कोठेही भारनियमन न करता महावितरणने 26,495 मेगावॉट पर्यंतची वीज सुरळीत पुरवण्यात यश मिळवले आहे. यामागे सूक्ष्म नियोजन, सक्षम व्यवस्थापन आणि सौरऊर्जेचा वाढता वापर हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत.

56
AI-आधारित आधुनिक वीज नियोजन

वीज मागणीचे अचूक अंदाज आणि वीजखरेदीचे कार्यक्षम नियोजन करण्यासाठी महावितरणने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे

मागणीचे वैज्ञानिक अंदाज

कमी खर्चात वीज खरेदी

आपत्कालीन परिस्थितीतील जलद निर्णय

वीजपुरवठ्याचे अधिक कार्यक्षम नियोजन

साध्य होत आहे. 

66
या धोरणाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

महावितरणचे हे सौर धोरण राज्यातील ऊर्जा व्यवस्थेच्या परिवर्तनात महत्त्वपूर्ण ठरत आहे. दिवसा अखंड वीज, स्थिर पुरवठा, कमी बिघाड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, खर्च आणि वेळ या तिन्ही पातळ्यांवर मोठा फायदा होत आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories