Raigad Accident: पुण्याहून कोकणाकडे निघालेल्या महिलेचा ताम्हिणी घाटात चालत्या कारवर दगड कोसळल्याने मृत्यू, सनरूफमधून आत घुसला आणि…

Published : Oct 30, 2025, 04:34 PM IST
Raigad Accident

सार

Raigad Tamhini Ghat Accident: रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात चालत्या कारवर दरड कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याहून मानगावला जात असताना सनरूफमधून दगड आत घुसल्याने ही भीषण दुर्घटना घडली. 

Raigad Tamhini Ghat Accident: रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट पुन्हा एकदा दुर्घटनेने हादरला आहे. चालत्या आलिशान कारवर दरड कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका अचानक झाला की, गाडीतील प्रवाशांना स्वतःला सावरण्याची संधीही मिळाली नाही.

घातक क्षण: दगड सनरूफ फोडून आत घुसला

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल गुजराती (वय 43) या आपल्या कुटुंबासह पुण्याहून मानगावच्या दिशेने कारने प्रवास करत होत्या. कार ताम्हिणी घाटातील एका तीव्र वळणावरून जात असतानाच अचानक डोंगरावरून मोठी दरड कोसळली. या दरडीतील दगड थेट कारच्या सनरूफवर आदळला आणि आत घुसत स्नेहल गुजराती यांच्या डोक्याला जबर धक्का बसला.

उपचाराआधीच झाला मृत्यू

स्नेहल गुजराती यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर ताम्हिणी घाटातील सुरक्षा उपाययोजनांबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे दरड कोसळण्यापासून बचावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरवर्षी पावसाळ्यात दरडीचा धोका

दरवर्षी पावसाळ्याच्या काळात ताम्हिणी घाटात अशा दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. जरी प्रशासनाकडून साफसफाई आणि इशारा फलक लावले जात असले तरी, पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना नाहीत, अशी प्रवाशांची नाराजी व्यक्त होत आहे. सध्या पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, संबंधित विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.

‘घाट प्रवास म्हणजे मृत्यूचा प्रवास?’

या दुर्घटनेनंतर एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

"घाटरस्त्यांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नेमकं कोण जबाबदार?"

स्नेहल गुजराती यांच्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून,

“ताम्हिणी घाटातून प्रवास करणं म्हणजे जीव धोक्यात घालणं” असं अनेकांचं म्हणणं आहे.

कुटुंबावर दु:खाचं सावट

या अपघातामुळे गुजराती कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलं आहे. तसेच कोकणात दरवर्षीच सर्पदंश आणि विंचूदंशासारख्या नैसर्गिक दुर्घटनांनीही अनेकांचे जीव घेतले आहेत. ताम्हिणी घाटातील ही घटना त्या यादीतील आणखी एक दुर्दैवी भर ठरली आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!