Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानाचं मोठं संकट! पुढचे 24 तास धोक्याचे, मुंबईसह 10 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा अलर्ट

Published : Sep 28, 2025, 05:12 PM IST

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला. पुढील 24 तास महत्त्वाचे असून, सखल भागांत पाणी साचण्याची, शेतीचे नुकसान होण्याची शक्यताय.

PREV
17
पावसाचा जोर वाढतोय, हवामान विभागाचा मुंबईसह अनेक जिल्ह्यांना इशारा!

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून, येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा धोका हवामान विभागाने जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाट, नाशिक घाट अशा महत्त्वाच्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पहाटेपासून पावसाचा जोर अधिकच वाढत आहे. सध्या हवामान खात्याकडून सतर्कतेचा सल्ला देण्यात येत असून नागरिकांनी गरजेपुरतीच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

27
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

अतिवृष्टी (Orange Alert)

मुंबई व उपनगर

ठाणे

पालघर

रायगड

पुणे घाट परिसर

नाशिक घाट परिसर

कोल्हापूर घाट 

अतिमुसळधार पाऊस (Severe Orange Alert)

रत्नागिरी

सातारा घाट

कोल्हापूर

पुणे शहर व परिसर

मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (Thunderstorm Alert)

जालना, बीड, हिंगोली, नांदेड

धुळे, अमरावती, अकोला, बुलढाणा

भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली

वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर 

37
पावसाची आकडेवारी काय सांगते?

गेल्या 24 तासांत (शनिवारी सकाळी 8:30 ते रविवारी सकाळी 8:30) मुंबईतील विविध भागांमध्ये खालील प्रमाणात पावसाची नोंद झाली.

कुलाबा: 120 मिमी (सर्वाधिक)

जुहू: 88 मिमी

सांताक्रूझ: 83.8 मिमी

वांद्रे: 82.5 मिमी

महालक्ष्मी: 28 मिमी 

47
सखल भागांमध्ये पूरस्थितीची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार, काही भागांमध्ये वाऱ्याचा वेगही अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची स्थिती उद्भवू शकते. नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी व शक्यतो घरातच सुरक्षित राहावे. 

57
शेतकऱ्यांची चिंता वाढली

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आता जोरदार पुनरागमनाने शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत यापूर्वीच झालेल्या पावसामुळे शेतीचं व जनजीवनाचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा पावसाची मुसळधार फेरी सुरू झाल्याने पुरपरिस्थितीची शक्यता गडद झाली आहे. 

67
नागरिकांसाठी सूचना

हवामान विभागाने दिलेला इशारा गांभीर्याने घ्या

आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका

सखल भागात राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलवा

स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा

पावसाळी उपकरणं (छत्री, रेनकोट) जवळ ठेवा

वीज कोसळण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षित अंतर राखा 

77
एकंदरीत परिस्थिती, अलर्टवर रहा!

महाराष्ट्रात हवामानाचा तडाखा सध्या जोरात आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा धोका असून, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभाग आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. 

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories