Maharashtra Rain Update: पुढचे 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे, कुठे होणार मुसळधार पाऊस? हवामान विभागाचा इशारा!

Published : May 26, 2025, 03:36 PM IST
 Heavy Rain

सार

महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार प्रवेश केला असून, मुंबई, पुणेसह अनेक भागात पाऊस पडत आहे. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनने कोकणात दमदार प्रवेश केला असून, त्यामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. या कालावधीत शेतकरी आणि चाकरमानी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा इशारा दिला आहे.

पुढील २४ तास महत्त्वाचे, कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आगामी २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून आणखी सक्रिय होऊन महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कालपर्यंत (२५ मे) मान्सून रत्नागिरी जिल्ह्यातील देवगडपर्यंत पोहोचला होता आणि आता तो मुंबईपर्यंत दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणत्या भागांमध्ये पडणार पाऊस?

सध्या कोकणासह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक भागांत पावसाने आगमन केले आहे. हवामान विभागानुसार, पुढील चार ते पाच दिवस कोकणासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये आणि पुणे जिल्ह्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबईत आज पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अनेक रेल्वे स्थानकांवरील रुळ पाण्याखाली गेले आहेत. भुयारी मेट्रोमध्येही पाणी साचले असून, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

पावसाच्या या तडाख्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनीही योग्य नियोजन करून शेतीची कामे हाती घ्यावीत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पावसाचा जोर लवकरच आणखी वाढू शकतो.

पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत. नागरिकांनी आणि प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे आहे. पावसाचे अचूक भाकीत आणि योग्य खबरदारीमुळे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा