महाडीबीटी प्रणालीअंतर्गत सध्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना (डीपीआर आधारित) या तीन प्रमुख योजना राबवल्या जात आहेत. या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून ३४ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३,४०,४५० शेतकऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार पूर्वसंमती देण्यात आली आहे.
पूर्वी या मंजुरीनंतर अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना एक महिन्याची मर्यादा होती. मात्र, पुरवठ्यातील विलंब आणि दरपत्रक बदलामुळे अनेकांना वेळेत खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कृषी विभागाने आता ही मुदतीची अट रद्द केली आहे.