१. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण: वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरांमधील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
२. परवान्यांचा पाऊस: राज्यात सध्या सुमारे १४ लाख रिक्षा परवाने आहेत. अनेक ठिकाणी एकाच घरात अनेक परवाने असल्याचे समोर आले आहे.
३. बेकायदेशीर परवान्यांचे रॅकेट: काही ठिकाणी बांगलादेशी नागरिकांना अवैध रितीने परवाने दिल्याच्या गंभीर तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि फेरनियोजन करणे आवश्यक आहे.
४. केंद्र सरकारची परवानगी: ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार परमिटबाबत निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राने राज्याला दिले आहेत.
५. नवीन धोरणाची आखणी: 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' अधिक सक्षम करण्यासाठी आणि नियमावलीत सुसूत्रता आणण्यासाठी सरकार नवीन धोरण तयार करत आहे.