महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ई-केवायसी संदर्भातील तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम सुरु आहे. तसेच, पात्र महिलांना दोन्ही महिन्यांचे हप्ते मिळायला हवेत, असं सरकारचं मत आहे.
दरम्यान, जर निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण झालं नाही, तर हप्ता बंद होईल का यावर कोणताही अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.