पोलंडमध्येही मला महाराष्ट्राचे दर्शन, PM मोदींनी जळगावात सांगितला किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगावात लखपती दीदी कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि लखपती दीदींना शुभेच्छा दिल्या. तसेच, नेपाळमधील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहिली.

Rameshwar Gavhane | Published : Aug 25, 2024 8:38 AM IST / Updated: Aug 25 2024, 02:13 PM IST

जळगाव: तुमच्या सर्वांमध्ये मला महाराष्ट्रातील गौरवशाली संस्कृती आणि संस्काराचे दर्शन होते. महाराष्ट्राचे हे संस्कार भारतच नाही तर जगात गेले आहेत. मी कालही विदेशी दौऱ्याहून आलो. मी यूरोपातील देश पोलंडमध्ये गेलो होतो. तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. महाराष्ट्राची संस्कृती, संस्काराचे दर्शन झाले. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा प्रचंड सन्मान करतात. तुम्ही येथे बसून त्याची कल्पना करू शकत नाही. तिथल्या राजधानीत एक कोल्हापूर मेमोरियल आहे. पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांची सेवा आणि सत्कारच्या भावनेला सन्मान देण्यासाठी बनवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाची केली सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगावात लखपती दीदी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते रविवारी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी म्हणाले की, माझी नजर जिथपर्यंत जाते तेथेपर्यंत आई-बहिणींचा महासागर दिसत आहे. हे दृश्य मनाला आनंद देणारे आहे.

 

 

लखपती दिदींना माझ्याकडून शुभेच्छा : पंतप्रधान मोदी

लखपती दिदीचे महासंमेलन होत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो बचत गटांसाठी सहा हजार कोटीहून अधिकची रक्कम जाहीर केली आहे. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील भगिनींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशातून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यात मदत मिळेल. सर्वांना माझ्या शुभेच्छा

नेपाळमधील मृतांना वाहिली श्रद्धांजली

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्या मृतांना नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, नेपाळ दुर्घटनेत आपण जळगावमधील अनेक सहकाऱ्यांना गमावले आहे. मी या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ही दुर्घटना झाल्यावर भारत सरकारने नेपाळ सरकारशी संपर्क साधला. आपण रक्षा खडसे यांना लगेच नेपाळला पाठवलं. जे लोक राहिले नाहीत, त्यांच्या पार्थिवांना आपण वायूसेनेच्या विमानाने आणलं. जे जखमी आहेत, त्यांच्यावर चांगले उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत एक कोटी दीदी लखपती झाल्या आहेत. रविवारी आज 11 लाख दीदींना लखपतीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. लवकरच एकूण 3 कोटी दिदी लखपती बनणार आहे.

आणखी वाचा : 

शेतकरी इंधन उत्पादक?, गडकरींनी शेतकऱ्यांना सांगितले 'श्रीमंत' होण्याचे सूत्र!

Share this article