
Spiritual : हिंदू धर्मात आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. बुधवार हा दिवस भगवान गणपती आणि बुध ग्रहाला समर्पित मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि आचरण जीवनातील अडथळे दूर करते, बुद्धी वाढवते आणि यश प्राप्त करून देते, अशी श्रद्धा आहे. मात्र, काही चुकीच्या सवयी किंवा कामांमुळे गणपती बाप्पा नाराज होऊ शकतात आणि त्याचा नकारात्मक परिणाम जीवनावर होऊ शकतो. त्यामुळे बुधवारी कोणती कामे टाळावीत, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बुधवार हा सात्त्विक मानला जातो. या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा तामसिक अन्न सेवन करणे अशुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, असे केल्याने बुध ग्रह कमजोर होतो आणि बुद्धी, आरोग्य व आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. गणपती बाप्पाच्या कृपेसाठी बुधवारी हलके, शुद्ध आणि सात्त्विक अन्नच घ्यावे.
बुधवार हा हिरव्या रंगाशी संबंधित आहे. हिरवा रंग समृद्धी, वाढ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. बुधवारी हिरव्या वस्तूंचा अपमान करणे, हिरव्या भाज्या फेकून देणे किंवा हिरव्या कपड्यांची नासधूस करणे टाळावे. शक्य असल्यास हिरवे वस्त्र परिधान करणे किंवा गरजू व्यक्तीला हिरवी भाजी दान करणे शुभ मानले जाते.
गणपती हे बुद्धी, विवेक आणि शांततेचे देवता आहेत. बुधवारी खोटं बोलणं, फसवणूक करणं किंवा विनाकारण वाद घालणं केल्यास गणपती बाप्पा नाराज होतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी संयम, नम्रता आणि सत्याचा मार्ग अवलंबल्यास मानसिक शांती लाभते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते.
परंपरेनुसार बुधवारी केस कापणे किंवा नखं कापणे टाळावे, असे मानले जाते. यामुळे बुध ग्रह कमजोर होतो आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात, अशी समजूत आहे. शक्य असल्यास हे काम इतर दिवशी करावे, जेणेकरून जीवनातील स्थैर्य टिकून राहील.
बुधवारी गणपतीची पूजा न करणे किंवा पूजा करताना निष्काळजीपणा दाखवणेही अशुभ मानले जाते. या दिवशी गणपतीला दूर्वा, मोदक आणि गुळ अर्पण केल्यास विशेष फलप्राप्ती होते. पूजा करताना मन शांत ठेवावे आणि नकारात्मक विचार टाळावेत. श्रद्धेने केलेली थोडीशी पूजा देखील मोठे सकारात्मक बदल घडवू शकते.