नवीन नियमानुसार, ग्राहकांच्या परवानगीशिवाय फोन लॉक केला जाणार नाही. तसेच, बँका आणि वित्तीय संस्थांना फोन लॉक केल्यानंतर वैयक्तिक माहिती पाहण्याची परवानगी नसेल. यामुळे बँकांना त्यांचे कर्ज वसूल करता येईल आणि ग्राहकांची माहितीही सुरक्षित राहील. पण काही बॅंका याचा गैरवापरही करु शकतात. ग्राहकाची परवानगी न घेता त्यांचा फोन लॉक करु शकतात.