भाताऐवजी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करणे. पण सलग ३० दिवस भात पूर्णपणे सोडून फक्त ज्वारीची भाकरी खाल्ल्यास शरीरात नेमके काय बदल होतात? चला, या फोटो गॅलरीतून सविस्तर जाणून घेऊया.
ज्वारीमध्ये फायबर भरपूर असतं. त्यामुळे भाकरी खाल्ल्यावर पोट बराच वेळ भरलेलं राहतं. यामुळे मधल्या वेळेत काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि कॅलरीजचं सेवन कमी होतं. परिणामी, हळूहळू वजन कमी व्हायला मदत होते.
25
शुगर कंट्रोल
भाताच्या तुलनेत ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही. ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना भविष्यात डायबिटीज होण्याचा धोका आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पण, औषधं घेत असाल तर आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
35
पचनक्रियेत बदल
सलग ३० दिवस ज्वारीची भाकरी खाल्ल्यास तुमच्या पचनक्रियेतही चांगले बदल दिसतील. फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि आतड्यांचं कार्य सुधारतं. मात्र, अचानक जास्त फायबर खाल्ल्यामुळे सुरुवातीला काहींना पोट फुगल्यासारखं किंवा गॅस झाल्यासारखं वाटू शकतं. म्हणून, आहारात हळूहळू ज्वारीचा समावेश करा आणि भरपूर पाणी प्या.
ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम यांसारखी खनिजं आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. ही पोषकतत्त्वं शरीराला ऊर्जा देतात आणि स्नायू व नसांचं कार्य सुधारण्यास मदत करतात. इतकंच नाही, तर ज्वारीतील अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतात.
55
भात सोडू शकत नसलेले...
भात पूर्णपणे सोडणं प्रत्येकाला शक्य नसतं. पांढरा भातसुद्धा कार्बोहायड्रेट्सच्या रूपात शरीराला ऊर्जा देतो. समस्या तेव्हा येते, जेव्हा आपण तो गरजेपेक्षा जास्त खातो. त्यामुळे भात पूर्णपणे न सोडता, तो प्रमाणात खा. आहारात ज्वारी, बाजरी, नाचणीसारख्या धान्यांचा आठवड्यातून काही दिवस समावेश करा. सोबतच पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणंही तितकंच महत्त्वाचं आहे.