Gandhi Jayanti 2025 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या 5 खास गोष्टी, आयुष्याला लावतील कलाटणी

Published : Oct 02, 2025, 08:51 AM IST

Gandhi Jayanti 2025 : आज देशभरात गांधी जयंती साजरी केली जात आहे. महात्मा गांधी हे सत्य, अहिंसा आणि साधेपणाचे प्रतीक होते. सत्याग्रह, स्त्रीसक्षमीकरण आणि जागतिक प्रभाव या त्यांच्या कार्यामुळे ते आजही संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत. 

PREV
16
आज गांधी जयंती

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते. सत्य, अहिंसा आणि स्वातंत्र्यलढ्याचे ते महान पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांनी केवळ भारतालाच नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या जीवनातील अनेक पैलू आजही तितकेच महत्त्वाचे ठरतात.

26
सत्य आणि अहिंसा ही जीवनमूल्ये

गांधीजींनी सत्य आणि अहिंसा या दोन तत्वांना आपल्या जीवनाचा गाभा बनवला. “सत्य हे देव आहे” असा त्यांचा विश्वास होता. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांनी हिंसेचा मार्ग न स्वीकारता शांततामय आंदोलनांच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. अहिंसात्मक लढ्याची ही संकल्पना आज जगभरात अभ्यासली जाते.

36
साधेपणाला दिलेले महत्त्व

गांधीजी साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. खादीचे वस्त्र परिधान करणे, चरखा चालवणे, साधे अन्न आणि साधे राहणीमान ही त्यांची ओळख होती. त्यांचा संदेश होता की देशातील सर्वसामान्य माणसाशी जवळीक साधायची असेल तर त्यांच्यासारखे जगले पाहिजे.

46
सत्याग्रहाची अनोखी संकल्पना

गांधीजींनी सत्याग्रह या आंदोलनपद्धतीचा वापर केला. अन्यायाविरुद्ध लढा देताना अहिंसेच्या मार्गाने आवाज उठवणे ही जगाला दिलेली त्यांची मोठी देणगी आहे. चंपारण सत्याग्रह, दांडी मार्च यांसारख्या आंदोलनांनी ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान दिले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला गती दिली.

56
महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन

गांधीजींनी महिलांना समाजातील समान हक्क मिळावेत यासाठी नेहमी आग्रही भूमिका घेतली. त्यांनी महिलांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या मते, समाजाच्या प्रगतीसाठी स्त्री-पुरुष समान सहभाग महत्त्वाचा आहे.

66
जागतिक प्रभाव

गांधीजींच्या विचारांनी केवळ भारतालाच नव्हे तर जगभरातील महान नेत्यांना प्रेरणा दिली. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर आणि नेल्सन मंडेला यांसारख्या नेत्यांनी गांधीजींच्या अहिंसात्मक लढ्याचा मार्ग स्वीकारून समाजात मोठे परिवर्तन घडवले. त्यामुळे गांधीजी जागतिक पातळीवरही आदरणीय व्यक्तिमत्व ठरले.

Read more Photos on

Recommended Stories