Dhurandhar Movie : रणवीर सिंग आणि सारा अर्जुनवर चित्रित झालेलं 'धुरंधर' सिनेमातील 'गहरा हुआ' हे गाणं आठवतंय? या गाण्यातील एक सीन पाकिस्तानात शूट झाल्याचं दाखवलंय, पण चाहत्यांच्या मते, तो सीन मुंबईतील एका मॉलमध्ये शूट झाला आहे. वाचा संपूर्ण प्रकरण.
'धुरंधर' रिलीज होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत आणि हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिंदी सिनेमा ठरला आहे. पण आता या सिनेमाबद्दल एक मजेशीर गोष्ट समोर आली आहे. चाहते आता 'धुरंधर: द रिव्हेंज' या सिक्वेलची वाट पाहत आहेत, जो १९ मार्चला रिलीज होणार आहे. दरम्यान, पहिला सिनेमा पुन्हा पाहताना चाहत्यांनी एक मोठी चूक शोधून काढली आहे, जी आता व्हायरल झाली आहे.
25
गहरा हुआ गाण्यातील सीन
हा व्हायरल झालेला सीन 'गहरा हुआ' गाण्यातील आहे. यात रणवीर सिंग आणि सारा अर्जुन पाकिस्तानच्या कराचीमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये फिरताना दिसतात. पण, काही हुशार चाहत्यांनी लगेच ओळखलं की हे ठिकाण त्यांना ओळखीचं वाटत आहे.
त्यांच्या मते, सिनेमात पाकिस्तानचा म्हणून दाखवलेला हा मॉल प्रत्यक्षात मुंबईतील मालाड पश्चिमेकडील इनॉर्बिट मॉल आहे. ही गोष्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेक जण म्हणतात की या चुकीमुळे सिनेमा पाहतानाचा अनुभव थोडा विस्कळीत झाला.
35
मुंबईत केलयं शूट
या सीनमध्ये रणवीर आणि सारा एका चकचकीत मॉलमध्ये फिरताना दिसतात. सिनेमाच्या कथेनुसार हे जोडपं पाकिस्तानात असतं, पण प्रेक्षकांनी हे ठिकाण मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील प्रसिद्ध इनॉर्बिट मॉल असल्याचं ओळखलं.
अनेक एक्स (ट्विटर) युझर्सनी या सीनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत मॉलचे तपशील दाखवले. एका युझरने गंमतीत म्हटलं की, 'व्हिडिओ काही सेकंदात कराचीहून थेट मालाडला पोहोचतो.' हा शोध लगेचच व्हायरल झाला आणि इतर प्रेक्षकांनीही ही गोष्ट खरी असल्याची खात्री केली.
चाहत्यांनी आणखी बारकाईने पाहिल्यावर त्यांना बॅकग्राउंडमध्ये अजून काही गोष्टी दिसल्या. ऑनलाइन व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये कलाकारांच्या मागे असलेल्या एका दुकानात नटराज, गणेश आणि बुद्धांच्या मूर्ती स्पष्ट दिसत आहेत. काही प्रेक्षकांनी प्रश्न विचारला की, पाकिस्तानमधील मॉलमध्ये अशा वस्तू कशा असू शकतात? एका रेडिट युझरने यावर बोट ठेवत म्हटलं की, सिनेमाच्या कथेनुसार हिंदू देवता आणि बौद्ध मूर्ती त्या ठिकाणी विकल्या जाणं हे पटत नाही. अर्थात, काही प्रेक्षकांनी मेकर्सची बाजू घेत म्हटलं की, मोठ्या सिनेमांच्या शूटिंगमध्ये अशा चुका होतात, कारण तिथे लक्ष कलाकारांवर आणि कथेवर जास्त असतं.
55
सिनेमाचे चित्रिकरण नक्की कुठे झालेय?
या व्हायरल प्रकरणातील गंमत म्हणजे, सिनेमाच्या टीमने इतर ठिकाणं तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. प्रोडक्शन डिझायनर सैनी एस जोहरे यांनी स्वतः सांगितलं की, सिनेमातील मुख्य ठिकाण असलेलं 'ल्यारी' (Lyari) भारतात शूट झालेलंच नाही. उलट, टीमने थायलंडच्या बँकॉक शहरात सहा एकर जागेवर त्याचा हुबेहूब सेट तयार केला होता. जोहरे म्हणाले की, हे ठिकाण पडद्यावर खरं वाटावं यासाठी डिझाइन प्रक्रियेला जवळपास तीन महिने लागले.