AIMIM नेते वॉरिस पठाण यांनी बकरीद, NEET पेपर लीक, महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. बकरीदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती स्थापन केल्याची माहिती देताना त्यांनी काही गटांवर वातावरण बिघडवल्याचा आरोप केला. तसेच NEET पेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाल्याचे म्हणत सरकारवर गंभीर आरोप केले. याशिवाय पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि केंद्र सरकारच्या निर्णयांवरही त्यांनी निशाणा साधला.