
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी NEET पेपर लीक प्रकरणावरून केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका केली. “२५ वेळा पेपर फुटणं ही सरकारची मोठी नाकामी आहे,” असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला. तसंच महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेरोजगारी, अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही त्यांनी निशाणा साधला. आंध्र प्रदेश सरकारच्या लोकसंख्या वाढ प्रोत्साहन योजनेवरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.