प्रेमानंद महाराज: २०२६ हे वर्ष पूर्णपणे आनंदात आणि शांततेत घालवायचे असेल तर काय करावे आणि काय करू नये? वर्षाची सुरुवात कशी असेल याबद्दलप्रेमानंद महाराजांनी सांगितले आहे. महाराज नेमके काय म्हणाले आहेत, ते या लेखातून जाणून घेणार आहोत.
नवीन वर्षाची उलटी गिनती सुरू झाली आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी लोक पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. सर्व पर्यटन स्थळे, मंदिरे भाविकांनी भरून गेली आहेत. हॉटेल्स, रिसॉर्ट्स, पार्टी हॉल्स फुल्ल होत आहेत.
27
मंदिराला भेट
काही लोक वर्षाच्या शेवटी मंदिरांना भेट देत आहेत. देवाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहेत. नवीन वर्ष कसे असावे, याबद्दल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे गुरू प्रेमानंद महाराज यांनी महत्त्वाचा संदेश दिला आहे.
37
प्रेमानंद महाराजांचा संदेश
नवीन वर्ष म्हणजे केवळ उत्सव आणि पार्टी नाही. उलट, व्यक्तीला आपले जीवन सुधारण्याची, वाईट कर्मे सोडून देण्याची आणि चांगली कामे स्वीकारण्याची ही एक संधी आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असे प्रेमानंद महाराजांनी म्हटले आहे.
प्रेमानंद महाराजांच्या मते, नवीन वर्षात पार्ट्या करण्याऐवजी पाप आणि वाईट वागणूक सोडून द्या. देवाची भक्ती वाढवा. दानावर लक्ष केंद्रित करा. यामुळे जीवनात खरा आनंद आणि शांती मिळेल, असे त्यांनी सांगितले आहे.
57
दारू, मांस सोडा
नवीन वर्षात दारू, मांस, हिंसा आणि व्यभिचार टाळा. हे नरकाचे दरवाजे उघडतात. शुभेच्छा देऊन अशुद्ध कार्यात गुंतणे हे पापाचे मूळ आहे. या व्यसनांना सोडून सदाचार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारा.
67
महिलांचा आदर करा
नवीन वर्षात सुखी राहण्यासाठी परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नका, अत्याचार करू नका. राग, चोरी, हिंसा यापासून दूर राहा. देवाचे नामस्मरण करा. यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य मंगलमय होईल.
77
मुलांसाठी संदेश
केवळ वैयक्तिकच नव्हे, तर समाज सुधारणाही महत्त्वाची आहे. मुलांनी वाईट गोष्टींपासून दूर राहावे. पाप आणि दुष्ट कृत्ये करणाऱ्यांना दुःख भोगावे लागते. आपल्याला मानवी जीवन मिळाले आहे, राक्षसी नाही.