
दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन शैक्षणिक सत्र सुधारण्यासाठी नसून केंद्र सरकारविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला. NEET पेपर लीक प्रकरणातील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा झाली असून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य नसल्याचे मत व्यक्त करत देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. देशाच्या प्रगतीसाठी दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.