
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. अशा घटनांमुळे तरुणांचं वर्तमान तर हिसकावून घेतलंच आहे, पण 'रखडलेल्या नोकरभरती'मुळे त्यांचं भविष्यही धोक्यात आलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकार फक्त 'सबबी' देत असल्याचा आरोप केला. "'जर (तरुणांना) नोकरी मिळाली नाही, तर सिंहासन डळमळीत होईल.' कोटा, देहरादूननंतर आता 'विद्यार्थ्यांचा आवाज' प्रयागराजपर्यंत पोहोचला आहे. हे तेच शहर आहे जिथे लाखो तरुण वर्षानुवर्षे तयारी करत आहेत - फॉर्म भरणं, फी भरणं आणि प्रतीक्षा करणं. पेपरफुटीने त्यांचा आज हिसकावून घेतला आहे," असं ते म्हणाले.
"रखडलेल्या नोकरभरतीने त्यांचा उद्याचा काळ हिसकावून घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीत, याच मुलांना लाठ्या आणि पॅलेट गनने मारहाण करण्यात आली, कारण काय तर ते आपल्या हक्कांसाठी बोलत होते. आम्ही त्यांचा आवाज उठवत राहू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. आता सबबी नकोत - जबाबदारी घ्या, नाहीतर खुर्ची खाली करा. ८ ऑगस्टला प्रयागराजमध्ये भेटू," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा।”
कोटा के बाद, देहरादून के बाद अब ‘छात्रों की गूंज’ प्रयागराज पहुंच रही है।
यह वो शहर है जहां लाखों नौजवान सालों से तैयारी कर रहे हैं - फ़ॉर्म भरते हैं, फीस देते हैं, और इंतज़ार करते रहते हैं।
पेपर लीक ने उनका आज छीना। रुकी हुई भर्तियों ने… pic.twitter.com/xrDt39tntn— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 3, 2026
२० जुलै रोजी राजधानी दिल्लीत 'संसद चलो' मोर्चादरम्यान आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईवरून विरोधक सरकारला लक्ष्य करत आहेत.
याआधी राहुल गांधी यांनी सरकारने आणलेल्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६ वर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "जेव्हा शस्त्रक्रियेची गरज होती, तेव्हा हे विधेयक म्हणजे जखमेवर मलमपट्टी करण्यासारखं आहे." हे विधेयक संसदेत मंजूर झालं आहे.