
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः शेतात उतरून नांगर धरत नैसर्गिक शेतीचा संकल्प केला. पर्यावरण संवर्धन आणि रासायनिक खतांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नैसर्गिक शेतीवरील व्याख्यानातून प्रेरणा मिळाल्याचे सांगत, स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आई-वडिलांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.