
Description या खास मुलाखतीत Manoj Jarange यांनी राज्यातील गंभीर प्रश्नांवर थेट भाष्य केलं आहे. वाढतं उन्ह, दुष्काळाची भीषण परिस्थिती, शेतकऱ्यांची हालअपेष्टा आणि जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न यावर त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. कर्जमाफीवर बोलताना त्यांनी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी केली असून Devendra Fadnavis यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत सरकारला तातडीने निर्णय घेण्याचं आवाहन केलं. संतोष देशमुख प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई, अटक आणि संपत्ती जप्तीची मागणी करत त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला.