कुंभ पर्वाचा सार म्हणजे तुमच्या आतील पूर्णत्व जाणून घेणे. ज्ञान, भक्ती आणि कर्म एकत्र आले कीच हे शक्य होते. येथे वाहणारी गंगा ही ज्ञानाचे प्रतीक आहे, तर यमुना भक्तीचे आणि अदृश्य सरस्वती कर्माचे प्रतीक आहे."
गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली हा एक परिवर्तनकारी अनुभव होता. यामुळे ऐक्याचा, शांतीचा, मानवतेला करुणेचा संदेश गेला. गुरुदेव म्हणाले, "गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम हा इडा, पिंगळा आणि सुषुम्ना शक्ती नाड्या दर्शवतो. ध्यानात आपण स्थिर झाल्यावर अमरत्वाचा अमृत अनुभवतो."