महाकुंभच्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 30 वर, DIG यांची माहिती

Published : Jan 30, 2025, 08:40 AM ISTUpdated : Jan 30, 2025, 08:59 AM IST
Maha Kumbh

सार

महाकुंभमधील चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. याबद्दलची माहिती डीआयडी यांच्याकडून देण्यात आली आहे.

Maha Kumbh Stampede :  महाकुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीमधील मृतांचा अधिकृत आकडेवारीच्या घटनेदरम्यान जवळजवळ 20 तासांनंतर प्रशासनाने जारी केला आहे. प्रशासनानुसार, या चेंगराचेंगरीमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 60 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. काही जणांच्या परिवारातील एकापेक्षा अधिक जणांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला आहे. कुंभर नगरचे डीआयडी वैभव कृष्णन यांनी माहिती देत म्हटले की, खूप गर्दी झाल्याने बॅरिकेट मोडले गेल्यानंतर चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवत ही घटना घडली.

महाकुंभचे मेलाधिकारी विजय किरण आनंद यांच्यासोबत पत्रकार परिषदेसाठी आलेल्या डीआयडी यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. केवळ एवढेच म्हटले की, आखाड्याच्या मार्गावर रात्री 1-2 वाजल्याच्या सुमारास खूप गर्दी झाली होती. मोठ्या प्रमाणात भाविक मौनी अमावस्येसाठी स्नान करण्यासाठी पोहोचले होते. याचवेळी चेंगराचेंगरी होत बॅरिकेट मोडले गेले आणि संगमच्या येथे घुसलेल्या जमावाने आधीच तेथे स्नान करण्यासाठी वाट पाहत असलेल्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. येथून एकूण 90 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

25 जणांची ओखळ पटली

डीआयजी यांनी म्हटले की, मृतांपैकी ज्या 25 जणांची ओखळ पटली आहे त्यापैकी चारजण कर्नाटकातील आहेत. एक-एक गुजरात आणि आसाममधील आहे. वैभव कृष्णन यांनी पुढे म्हटले की, 1920 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून एखादा बेपत्ता झाला असल्यास त्याच्याबद्दलची माहिती तेथे मिळू शकते. शासनाने आधीच कठोर निर्देशन दिले होते की, कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल आता किंवा पुढेही नसणार आहे.

 

शाही स्नान रद्दची घोषणा

महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आखाडा परिषदेने शाही स्नान देखील रद्द केले होते. खुद्द आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्र पुरी यांनी शाही स्नान रद्द करत असल्याची घोषणा केली होती. पण नंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महामंडलेश्वरांसोबत बातचीत करुन शाही स्नानाचा निर्णय घेतला. यानंतर ठरवण्यात आलेल्या शेड्यूलनुसार नागा साधु आणि संतांनी शाही स्नान केले.

आणखी वाचा : 

केजरीवालवर FIR, यमुना जलप्रकरणी हरियाणा सरकारची कारवाई

संगमच्या महाकुंभात दुर्घटना

PREV

Recommended Stories

PM Modi Instagram: PM मोदींचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स, ठरले जगातील नंबर 1 नेते
तेलंगणामध्ये काळजाचा थरकाप! सतत रडणाऱ्या २ महिन्यांच्या बाळाला आईनेच संपवलं