
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बांद्रा गरीब नगर येथील अतिक्रमण कारवाईवरून सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी, Saathi App, AI आधारित मार्गदर्शन आणि पावसाच्या माहितीच्या अॅपवरही प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींच्या मोदी, अमित शाह आणि RSS संदर्भातील वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केलं. तसेच BMC मध्ये महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीवरही त्यांनी टीका केली.