IND vs PAK : हस्तांदोलन वाद पुन्हा पेटला! सामना संपताच गंभीरचा निर्णय, खेळाडूंना ड्रेसिंगरूममधून बोलावलं आणि...

Published : Sep 22, 2025, 11:11 AM IST
india vs pakistan super four asia cup 2025

सार

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ‘हस्तांदोलन वाद’ पुन्हा पेटला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्यानंतर गौतम गंभीरने ड्रेसिंगरूममधून खेळाडूंना बोलावून अंपायर व मॅच रिफरींसोबत हस्तांदोलन करण्यास सांगितले. 

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सुपर-4 सामन्यानंतर पुन्हा एकदा ‘हस्तांदोलन वाद’ तापला आहे. यावेळी केंद्रस्थानी भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर होते. भारताने विजय मिळवल्यानंतर गंभीरने सीमारेषेजवळ उभं राहून खेळाडूंना ड्रेसिंग रूममधून बोलावलं आणि अंपायर्स व मॅच रिफरींसोबत हस्तांदोलन करण्यास सांगितलं.

यापूर्वी नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन टाळले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात काही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. तिलक वर्मा व हार्दिक पांड्या थेट ड्रेसिंगरूमकडे गेले होते. मात्र, गंभीरच्या सूचनेनंतर खेळाडूंनी अंपायर व मॅच रिफरी अँडी पायकॉफ्ट यांच्यासोबत हस्तांदोलन केले.

 

 

खेळाच्या घडामोडीत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 172 धावा केल्या. भारतासाठी अभिषेक शर्मा (39 चेंडूत 74) आणि शुभमन गिल (28 चेंडूत 47) यांनी दमदार सुरुवात करून दिली. अखेरीस तिलक वर्मा (नाबाद 30) च्या खेळीमुळे भारताने 6 गडी राखून सहज विजय मिळवला आणि सुपर-4 मधील आपली स्थिती मजबूत केली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा