काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्र्यांच्या जबाबदारीपासून ते भ्रष्टाचार, महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शिक्षण व्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारला घेरलं. इराण, रशिया, अमेरिका आणि इस्रायल संदर्भातील भारताच्या परराष्ट्र धोरणावरही दलवाई यांनी प्रश्न उपस्थित केले. तसंच लोकसंख्या नियंत्रण, फॅमिली प्लॅनिंग आणि महिलांच्या समान अधिकारांवरही त्यांनी भूमिका मांडली.