दिल्लीत वादळी वारे अन् मुसळधार पाऊस, झाडे कोसळली, पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक विस्कळीत

Published : May 02, 2025, 07:06 AM ISTUpdated : May 02, 2025, 07:12 AM IST
दिल्लीत वादळी वारे अन् मुसळधार पाऊस, झाडे कोसळली, पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक विस्कळीत

सार

भारतीय हवामान खात्याने दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, झारखंड, राजस्थान आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे दिल्लीत जोरदार पाऊस झाला आहे.  

गुरुवारी दिल्ली-गाझियाबादसह उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि थंड वाऱ्यांमुळे गारवा निर्माण झाला. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि गारपीट झाली. गोरखपूर आणि बस्तीमध्ये वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला.

गोरखपूरमध्ये अचानक गारपीट

गुरुवारी गोरखपूरमध्ये अचानक झालेल्या गारपिटीमुळे लोक घाबरले. गारांचा आकार इतका मोठा होता की ५० हून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे काचे, हेडलाईट आणि साइड मिरर फुटले. गोरखपूरमध्ये वीज पडून एका वृद्ध महिला आणि एका अल्पवयीनाचा मृत्यू झाला, तर बस्तीमध्ये एका दाम्पत्याचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा: सात वेळा नापास झालेला मजूर, आठव्यांदा यशस्वी झाला

दिल्लीसह इतर राज्यांमध्ये पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, झारखंड, राजस्थान आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये पुढील काही दिवस वादळी वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ४ मे पर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये वादळी वारे आणि पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात तापमान अजूनही सामान्यपेक्षा जास्त आहे आणि उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

 

 

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-३ वर पत्र्याचे छप्पर कोसळले

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या पावसाचा आधीच इशारा देण्यात आला होता. सततच्या पावसामुळे दिल्लीतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे, ज्यामुळे लोकांना प्रवासात अडचणी येत आहेत. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-३ वर पत्र्याचे छप्पर कोसळले. याशिवाय दिल्ली आणि परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

विमानसेवेवर परिणाम

दिल्ली आणि एनसीआरमध्ये मुसळधार पावसाचा विमानसेवेवर परिणाम झाला आहे. अनेक विमाने विलंबाने उड्डाण करत असून काही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. प्रवाशांना इतर शहरांमध्ये जाण्यासाठी बराच वेळ लागत आहे. त्यांना दिल्ली विमानतळावर तातकाळत बसावे लागत आहे.

PREV

Recommended Stories

2025 मध्ये फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट 10 ठिकाणे, डिसेंबर-जानेवारीत करा प्लॅन
फेऱ्यांच्या आधीच बॉयफ्रेंडला भेटायला गेली नवरी, व्हायरल व्हिडिओवरून वाद निर्माण