मुंबईत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील वादळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. 23 मे ते 6 जूनदरम्यान झालेल्या पाऊस आणि वादळामुळे सुमारे 7,142 हेक्टरवरील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीक विमा आणि तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि स्थानिक आमदारांसोबत बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मुद्द्यावरही लवकर निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.