24X7 एसी वापरत असाल तर नक्की या टिप्स लक्षात ठेवा, नोएडा घटनेनंतर अग्निशमन विभागाने सांगितल्या टिप्स

नोएडामधील एका पॉश हायराईज सोसायटीमध्ये स्प्लिट एसी युनिटमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली.याविषयी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार चौबे यांनी सांगितले की आग एका खोलीत लागल्याने आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

Ankita Kothare | Published : May 31, 2024 4:43 PM IST

दिल्ली : या आठवड्याच्या सुरुवातीला नोएडातील एका पॉश हाय- राईज सोसायटीमधील फ्लॅटमध्ये आग लागली होती. घरातील स्प्लिट एअर कंडिशनर युनिटमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे.

नोएडा येथील फ्लॅटमध्ये लागलेली आग एअर कंडिशनरमधील स्फोटामुळे लागली होती. स्प्रिंकलर, एक्टिंग्विशर्स, होसेस यांसारख्या अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याने, आग जास्त पसरली नाही आणि ती एका खोली पुरतीच मर्यादित राहिली होती. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीपकुमार चौबे यांनी याविषयी नागरिकांना काही आवाहन केले आहे. जाणून घ्या काय म्हणाले अग्निशमन विभागाचे अधिकारी...

काय म्हणाले अग्निशमन विभागाचे प्रमुख :

"बाहेरील तापमान जवळपास ५० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. ज्यामुळे एअर कंडिशनरचा जास्त वापर होतो आणि विजेची मागणी वाढत आहेत. मी लोकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी दिवसभर एसी वापरू नये," मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणाले की, तुमच्या एसी सेवा नियमितपणे मिळणे महत्वाचे आहे आणि त्यावर अतिरिक्त भार टाकू नका. कारण बाहेरील वातावरण देखील खूप गरम असल्याने अश्या घटना आणखी घडू शकता त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.

एसी स्फोट म्हणजे नक्की काय:

"AC स्फोट" म्हणजे वातानुकूलित (AC) युनिटचा समावेश असलेला स्फोट किंवा आग. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मते, अशा घटना विविध कारणांमुळे घडू शकतात, बहुतेकदा विद्युत किंवा यांत्रिक बिघाडांशी संबंधित असतात.तसेच जास्त वेळ एसी चालविल्याने तो गरम होऊन त्यात स्फोट होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत दररोज 200 हून अधिक आगीच्या घटना नोंदवल्या जातात :

वाढत्या तापमानामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. "आम्हाला दररोज 200 हून अधिक आगीशी संबंधित कॉल येत आहेत, गेल्या 10 वर्षातील हा उच्चांक आहे... सर्व उपकरणे आणि मनुष्यबळ ताणले गेले आहे, दिल्ली अग्निशमन विभागासाठी ही कठीण वेळ आहे. मुलांसह 12 जणांनी आतापर्यंत मे मध्ये दिल्लीत मृत्यू झाला आहे. आम्हाला प्रामुख्याने उद्योग आणि गोदामांशी संबंधित औद्योगिक क्षेत्रातून फोन येत आहेत आणि या भागात जास्त वेळ लागतो..जर तापमान फक्त 1 अंशाने वाढले, तर मला वाटते की कॉल दररोज 250 ओलांडतील. आम्ही नवीन तंत्रज्ञान स्वीकारले आहे. अग्निशमन विभागाने पहिल्यांदाच ड्रोनसारखी अनेक उपकरणे खरेदी केली आहेत, असे दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी एएनआयला सांगितले.

आणखी वाचा :

अरविंद केजरीवाल यांना २ जुनलाच करावे लागणार आत्मसर्पण, सर्वोच्च न्यायालयाने याचिकाच स्वीकारली नाही

राजकोट गेमिंग झोन आग दुर्घटना: वकिलांनी आरोपीचा खटला लढण्यास दिला नकार, या प्रकरणात अधिकारी निलंबित

Share this article