Bhopal Wedding Crisis LPG Shortage Forces Groom to Change Menu Last Minute: सध्या देशभरात LPG गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवत आहे.भोपाळमध्ये एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये १५०० लोकांसाठी जेवण बनवायचं होतं, पण सिलेंडरच मिळाले नाहीत.
भोपाळमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे एका लग्नाचा मेन्यू बदलावा लागला. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे भारतात LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरांपासून गावांपर्यंत लोकांना सिलेंडर मिळत नाहीयेत. आता याचा परिणाम थेट लग्नसोहळ्यांवर दिसू लागला आहे.
25
ही घटना भोपाळच्या ईटखेडी भागातील स्वयंवर मॅरेज गार्डनमधली आहे. इथे रोहित माळी नावाच्या तरुणाचं लग्न होतं. त्याने रिसेप्शनसाठी तब्बल १८ ते २० पदार्थांचा मेन्यू ठरवला होता. पण ऐनवेळी गॅस सिलेंडरची व्यवस्थाच झाली नाही, त्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबीयांची आणि आचाऱ्याची धांदल उडाली. कारण जेवण तब्बल १५०० लोकांसाठी बनवायचं होतं. नवरदेव आणि नवरीच्या घरच्यांनी आदल्या दिवसापर्यंत सिलेंडर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही.
35
जेव्हा गॅस सिलेंडर मिळालेच नाहीत, तेव्हा दोन्ही कुटुंबांनी नाइलाजाने रिसेप्शनचा प्लान बदलला. त्यांनी गॅस शेगडीऐवजी लाकडाच्या चुलीवर जेवण बनवण्याचा निर्णय घेतला. आधी लग्नाचा मेन्यू बदलला, मग भरपूर लाकडं गोळा केली. त्यानंतर रातोरात १२०० ते १५०० लोकांसाठी गरमागरम दाल-बाफले तयार केले.
नवरदेव रोहितने मीडियाशी बोलताना सांगितलं, 'आम्ही रिसेप्शनमध्ये खूप वेगवेगळे पदार्थ बनवण्याचं ठरवलं होतं. सगळी तयारी झाली होती. पण अचानक गॅस मिळणार नाही हे कळल्यावर आम्ही खूप घाबरलो. आता काय होणार, उद्या पाहुणे आल्यावर त्यांना काय खायला घालणार, हेच आम्हाला कळत नव्हतं.'
55
अखेर मॅरेज गार्डनमध्ये गॅस शेगड्यांऐवजी लाकडाच्या चुली पेटल्या. हे दृश्य खूपच वेगळं होतं. पण पाहुण्यांना हे दाल-बाफले इतके आवडले की त्यांनी या अस्सल पदार्थाचं खूप कौतुक केलं. ते म्हणाले, 'गॅसची समस्या पुढेही वाढू शकते, त्यामुळे लग्नकार्य करताना या गोष्टीची काळजी घ्यायला हवी.'