कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांवर त्यांनी सवाल उपस्थित केले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच देशांच्या दौऱ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पाहा अरविंद सावंत नेमकं काय म्हणाले…