मुंबई विद्यापीठाने आमंत्रण रद्द करण्यामागे काय कारण? नसीरुद्दीन शाह यांचा आरोप

Published : Feb 06, 2026, 08:51 AM IST

Naseeruddin Shah says Mumbai University cancelled event invitation : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना मुंबई विद्यापीठाने 'जश्न-ए-उर्दू' कार्यक्रमासाठी आमंत्रित करून ऐनवेळी नकार दिला. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी आरोप केला आहे.

PREV
14
जश्न-ए-उर्दू कार्यक्रम

मुंबई विद्यापीठाने ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना 'जश्न-ए-उर्दू' कार्यक्रमासाठी आमंत्रित करून ऐनवेळी नकार दिला. यावर अभिनेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, 'विश्वगुरूं'वर टीका केल्यामुळेच हे घडल्याचे सांगत पंतप्रधान मोदींचे नाव न घेता आक्षेप घेतला आहे.

24
आमंत्रण आले होते

याबद्दल एका वृत्तपत्रात लेख लिहून नसीर यांनी म्हटले आहे की, 'विद्यापीठाच्या उर्दू विभागाने १ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मला बोलावले होते. मला विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आवडतो,' असे त्यांनी सांगितले.

34
नसीरुद्दीन शाह यांची नाराजी

'पण, ३१ जानेवारीच्या रात्री मला फोन करून आमंत्रण नाकारण्यात आले. नंतर मी स्वतःच कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे सांगण्यात आले,' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

44
टीकेमुळे विद्यापीठाने आमंत्रण नाकारले

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना शाह म्हणाले, 'मी स्वयंघोषित विश्वगुरूंची कधीच प्रशंसा केली नाही, उलट टीकाच केली. गेल्या १० वर्षांत त्यांनी केलेले कोणतेही काम मला आवडलेले नाही.' मोदींवर टीका केल्यामुळेच विद्यापीठाने आमंत्रण नाकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Read more Photos on

Recommended Stories