टॉलिवूड स्टार समंथा खरंच चित्रपटसृष्टी कायमची सोडणार होती का? तिला हा मोठा निर्णय घेण्यापासून कोणी रोखलं? आणि या सगळ्यात दिग्दर्शक राज निदिमोरू यांची भूमिका काय होती? जाणून घ्या.
जवळपास दशकभर समंथा तेलुगू सिनेमाची क्वीन होती. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होते आणि तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण मायोसिटिस आजारपण आणि वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे तिच्यावर मोठा परिणाम झाला. ती इतकी खचली की तिने आपलं अभिनय करिअर कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला होता.
24
तीन वर्षांच्या ब्रेकमध्ये काय केले?
आजारापणामुळे समंथाला जवळपास दोन वर्षं घरी राहावं लागलं. सुमारे तीन वर्षं मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्याने तिचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला. 'प्रेक्षक अजूनही मला पाहण्यासाठी तिकीट काढतील का? मी पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभी राहू शकेन का?' अशी चिंता तिला सतावत होती. याच भीतीमुळे तिने चित्रपट सोडून पडद्यामागे काम करण्याचा किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार सुरू केला.
34
राज निदिमोरू यांचा सल्ला
जेव्हा समंथाने अभिनय सोडायचं ठरवलं, तेव्हाच दिग्दर्शक-निर्माते राज निदिमोरू पुढे आले. त्यांनी तिच्या निर्णयाला पूर्णपणे विरोध केला. त्यांनी तिला तेलुगू प्रेक्षकांमधील तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आणि स्टारडमची आठवण करून दिली. राज यांनी तिला तिची प्रतिभा वाया न घालवण्याचा सल्ला दिला आणि आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी सेटवर परतणं हाच एकमेव मार्ग असल्याचं पटवून दिलं. इतकंच नाही, तर त्यांनी 'मा इंति बंगारम' ही कथा निवडली आणि तिला मोठ्या पडद्यावर परत आणण्यासाठी तिच्यासोबत चित्रपट निर्मितीची जबाबदारीही स्वीकारली.
राज निदिमोरू यांच्या प्रोत्साहनामुळे समंथाने आपला निर्णय बदलला आणि 'मा इंति बंगारम'मध्ये काम केलं. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला, विशेषतः महिला प्रेक्षकांमध्ये. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटाच्या सक्सेस मीटमध्ये भावुक झालेल्या समंथाने सांगितलं, 'मी चित्रपट कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण राज गारूंनी माझा निर्णय नाकारला आणि मला पुन्हा अभिनय करण्यासाठी तयार केलं. आज त्यांच्या पाठिंब्यामुळेच मला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळत आहे.' योग्य वेळी मिळालेला योग्य सल्ला एका महान अभिनेत्रीचं करिअर कसं वाचवू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.