Entertainment: भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास बदलणाऱ्या 'बाहुबली' सिनेमामागची मेहनत आजही सगळे आठवतात. आता '#BaahubaliTheTorchbearer' या कार्यक्रमात बोलताना प्रभास खूप भावूक झाला आणि त्याने अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.
प्रभासने बाहुबलीच्या दिवसांची आठवण काढली. तो म्हणाला की, हा संपूर्ण प्रवास त्याच्यासाठी एका भयंकर युद्धासारखा होता. सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी आलेल्या निगेटिव्ह प्रतिक्रियांवरही तो बोलला. प्रभास म्हणाला, "जर सिनेमा फ्लॉप झाला असता, तर निर्माते शोबू यारलागड्डा, प्रसाद देविनेनी आणि दिग्दर्शक राजामौली रस्त्यावर आले असते. त्यांचं संपूर्ण आयुष्य पणाला लागलं होतं."
23
जपान म्हणजे माझं दुसरं घर
याच कार्यक्रमात प्रभासने जपानच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला, 'जपानचे प्रेक्षक खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ आहेत.' बाहुबलीला त्यांनी ज्या प्रकारे स्वीकारलं आणि मला जो सन्मान दिला, त्यामुळे जपान आता मला माझ्या दुसऱ्या घरासारखं वाटतं, असं प्रभासने सांगितलं.
33
बाहुबली संपल्यावर खूप टेन्शन आलं होतं
बाहुबलीच्या जागतिक यशानंतर आलेल्या मानसिक दबावावरही प्रभास मोकळेपणाने बोलला. त्याने कबूल केलं की, 'एवढ्या मोठ्या यशानंतर पुढे काय करायचं, कोणत्या कथा निवडायच्या, याबाबत गोंधळ निर्माण झाला होता.' बाहुबली संपल्यानंतरचे दिवस खूप तणावपूर्ण आणि अनिश्चिततेचे होते, असं प्रभासने त्याच्या जुन्या दिवसांतील मानसिक स्थितीबद्दल सांगितलं.