उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार पदार्थांऐवजी फळे, भाज्या, आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा. जसे की ओट्स, नाचणी, ज्वारी, फळे आणि हिरव्या भाज्या – हे पचनासाठी चांगले असतात.
दररोज किमान २.५ ते ३ लिटर पाणी प्या. पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि अन्न पचायला मदत होते. कमी पाणी प्यायल्यास भूक जास्त लागते आणि अनावश्यक खाणं होतं.
ररोज किमान ३०-४५ मिनिटे व्यायाम करा. सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करणे उत्तम, कारण तेव्हा तापमान थोडं कमी असतं.
७-८ तासांची शांत झोप घ्या. झोप कमी झाली तर भूक वाढते आणि वजन वाढू शकतं. रात्री उशिरा खाणे टाळा – पचन प्रक्रियेसाठी हे हानिकारक असते.
तणावामुळे बऱ्याचदा जास्त खाण्याची इच्छा होते, त्यामुळे ध्यान किंवा छंद जोपासा. कमी झोप आणि जास्त तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढते, ज्यामुळे चरबी साठते.