एकीकडे लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत, तर दुसरीकडे लग्न झालेल्यांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या समस्या आहेत. एका सर्वेक्षणानुसार, भारतात 2047 पर्यंत लग्नसंस्थाच अस्तित्वात राहणार नाही, असं म्हटलं जातंय.
लेखक संदीप दास यांनी राज शामानी यांच्यासोबतच्या मुलाखतीत हा दावा केला आहे. दास यांच्या मते, भारतात लग्नसंस्था लवकरच संपुष्टात येईल. सध्या भारतात ९५% प्रौढ विवाहित आहेत, पण भविष्यात हा आकडा १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली येईल. अमेरिका आणि चीनप्रमाणेच इथेही परिस्थिती निर्माण होईल, असं ते म्हणाले. संदीप दास हे 'Building Leaders for Tomorrow' चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
26
अमेरिका, चीनमध्ये परिस्थिती कशी आहे?
अमेरिकेतील परिस्थिती: 'मॉर्गन स्टॅनले'च्या २०१९ च्या संशोधनानुसार, २०३० पर्यंत अमेरिकेतील ४५% महिला अविवाहित राहतील. साहजिकच, मुलींनी लग्न केलं नाही, तर मुलंही अविवाहितच राहणार.
चीनमधील परिस्थिती: चीनमध्ये लग्नाचा बाजार थंड झाला आहे. एका रिपोर्टनुसार, १९८० नंतर चीनमधील लग्नांची संख्या सर्वात कमी झाली आहे. इथे दरवर्षी २८ लाख घटस्फोट होतात. घटस्फोट टाळण्यासाठी सरकारने १२ ते १८ महिन्यांचा 'कूलिंग ऑफ पीरियड' ठेवला आहे. इथे पोटगीची व्यवस्था नाही.
36
लग्ने मोडण्याची ५ प्रमुख कारणे
लग्नसंबंध तुटण्यामागे ही ५ प्रमुख कारणं सांगितली जातात: स्वातंत्र्य (Independence), पुरुषप्रधानता (Patriarchy), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सोशल मीडिया (Social Media) आणि भ्रम (Delusion). भारतात ३० वर्षांपुढील अनेक यशस्वी आणि सुंदर महिला स्वतःच्या 'पसंतीने' अविवाहित राहत आहेत.
• यूगोव्ह सर्व्हे २०२३: यानुसार, ४०% शहरी भारतीयांनी 'लग्न आमच्या आयुष्यात महत्त्वाचं नाही' असं म्हटलं आहे.
• इंडियालेंड्स सर्व्हे: ६७% तरुण-तरुणींच्या मते, आर्थिक स्थैर्य ही त्यांची पहिली पसंती आहे, लग्न नंतर बघू असं त्यांचं म्हणणं आहे.
• रेंट अ बॉयफ्रेंड: जपानमध्ये कार्यक्रमात 'लग्न कधी?' या प्रश्नाचा त्रास टाळण्यासाठी बॉयफ्रेंड भाड्याने मिळतात. आता मुंबई, बंगळुरूतही असे स्टार्टअप्स सुरू झाले आहेत!
56
यशस्वी महिलांना समाज स्वीकारत नाही का?
भारतीय समाजात जास्त पगार असलेल्या महिलांना पुरुष सहजपणे स्वीकारत नाहीत. पुरुष सौंदर्य आणि शांतता शोधतात, तर महिला संसाधनं आणि सुरक्षितता शोधतात. जास्त कमावणारी स्त्री तिच्यापेक्षा जास्त पगार असलेल्या पुरुषाच्या शोधात असते. पण ६०-७० लाख कमावणाऱ्या पुरुषाला तिच्या पैशांपेक्षा तिचं सौंदर्य आणि जुळवून घेण्याचा स्वभाव महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे स्वतंत्र महिला अविवाहित राहत आहेत.
66
कंगना रणौतनेही हेच सांगितले होते
अभिनेत्री कंगना रणौतने एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं, 'ज्या नात्यात स्त्री जास्त शक्तिशाली आणि श्रीमंत असते, ते नातं जास्त काळ टिकत नाही.' आजकाल २० हजार कमावणाऱ्या मुलीलाही १ कोटींचं पॅकेज आणि ६ फूट उंचीचा मुलगा हवा असतो. आजची पिढी नात्यात येण्याआधीच 'हे जमणार नाही' किंवा 'तो धोका देईल' असा नकारात्मक विचार करते. नातं टिकवण्याऐवजी त्यात चुका शोधल्या जातात. याच कारणांमुळे भारतात लग्नसंस्था मोठ्या संकटात आहे.