शेतजमिनीचे वाद आता संपणार! सरकारची ‘सलोखा योजना’ ठरणार गेमचेंजर; फक्त 2 हजारांत होणार फेरफार

Published : Jan 24, 2026, 04:45 PM IST

Salokha Scheme : महाराष्ट्र सरकारने 'सलोखा योजनेला' 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ दिली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जमिनीच्या ताब्यावरून असलेले वाद मिटण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत शेतकरी ₹2000 च्या नाममात्र शुल्कात जमिनीची कायदेशीर अदलाबदल करू शकतात. 

PREV
16
शेतजमिनीचे वाद आता संपणार! सरकारची ‘सलोखा योजना’ ठरणार गेमचेंजर

Salokha Scheme : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतजमिनीचा ताबा आणि नावातील विसंगती यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद आता कायमचे मिटणार आहेत. राज्य सरकारने अत्यंत चर्चेत असलेल्या ‘सलोखा योजनेला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ दिली असून, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

26
नेमकी अडचण काय होती?

राज्यात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती दिसून येते की, एका शेतकऱ्याच्या नावावर जमीन असते, पण प्रत्यक्ष ताबा दुसऱ्याकडे असतो. तर ज्याच्याकडे जमीन आहे, त्याच्या नावावर ती नोंद नसते. या गोंधळामुळे शेतकऱ्यांना बँक कर्ज, पीकविमा, अनुदान आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून सरकारने सलोखा योजना सुरू केली होती. 

36
सलोखा योजनेचा मोठा फायदा काय?

या योजनेमुळे आता जमिनीची कायदेशीर अदलाबदल करणे अत्यंत सोपे आणि स्वस्त झाले आहे.

फक्त ₹1000 नोंदणी शुल्क + ₹1000 मुद्रांक शुल्क

एकूण खर्च केवळ ₹2000

बाजारभावानुसार लागणारी लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी पूर्णपणे वाचणार

म्हणजेच, कमी खर्चात जमिनीचा अधिकृत फेरफार करून नाव आणि ताबा एकाच व्यक्तीकडे आणता येणार आहे. 

46
कोणाला मिळेल योजनेचा लाभ?

सलोखा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत.

ज्या जमिनीची अदलाबदल करायची आहे, ती जमीन किमान 12 वर्षांपासून एकमेकांच्या ताब्यात असणे आवश्यक

ही योजना फक्त शेती जमिनीसाठी लागू आहे (घर किंवा प्लॉटसाठी नाही)

जमीन शेती गटातील असावी, अकृषिक (NA) नसावी

दोन्ही शेतकऱ्यांची लेखी संमती अनिवार्य 

56
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा

या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीची अदलाबदल करताना ‘तुकडेबंदी कायदा’ लागू होणार नाही. यामुळे पूर्वी अडथळा ठरणाऱ्या अनेक कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत. 

66
‘सलोखा योजनेचा’ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ

सलोखा योजना ही शेतकऱ्यांसाठी वादमुक्त जमीन, सुरक्षित मालकी हक्क आणि आर्थिक स्थैर्य देणारी योजना ठरणार आहे. कमी खर्चात, सोप्या पद्धतीने आणि कायदेशीर मार्गाने जमीन व्यवहार पूर्ण करता येणार असल्याने या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories