Ration Card Update : सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील 3.33 लाख शिधापत्रिका रद्द; काय आहे कारण?

Published : Aug 09, 2025, 07:19 PM IST
dehradun ration card update free ration delay pos machine data collection

सार

महाराष्ट्र सरकारने ३.३३ लाख शिधापत्रिका निष्क्रिय केल्या असून, सहा महिन्यांपासून धान्य न घेणाऱ्या आणि संशयास्पद कार्डधारकांना धान्यवाटप थांबवण्यात आले आहे. यामुळे पात्र कुटुंबांना शिधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे : राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने तब्बल 3 लाख 33 हजार शिधापत्रिका निष्क्रिय केल्या असून, त्या धारकांना धान्यवाटप तातडीने थांबवण्यात आले आहे. मागील सहा महिन्यांपासून शिधावाटप न घेणाऱ्या आणि संशयास्पद रेशन कार्डांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पात्र आणि गरजू कुटुंबांना आता शिधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणत्या शिधापत्रिकांवर गंडांतर?

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, सुमारे 3.33 लाख शिधापत्रिकांवर सहा महिन्यांहून अधिक काळापासून धान्य उचललेले नाही. त्यामुळे या कार्डांच्या प्रामाणिकतेबाबत शंका निर्माण झाली होती. तपासणीदरम्यान पुढील बाबी स्पष्ट झाल्या:

मृत व्यक्तींच्या नावे अद्याप शिधापत्रिका अस्तित्वात

स्थलांतरित किंवा इतरत्र गेलेल्या कुटुंबांची नोंद न केलेली

काही बनावट माहितीवर मिळवलेली शिधापत्रिका

शासनाची कारवाई आणि उद्दिष्ट

या साऱ्या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने अशा निष्क्रिय शिधापत्रिकांवर तात्काळ शिधावाटप थांबवले असून त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे वास्तविक गरजू नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणे आणि प्रतीक्षा यादीतील पात्र कुटुंबांना लाभ देणे.

शहरातील आकडेवारी

फक्त पुणे शहरातच 8 लाख 73 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. यातील मोठ्या संख्येने शिधापत्रिका न वापरण्यात आल्याचे लक्षात आल्याने, राज्य सरकारने अशा कार्डांवरील वाटप थांबवून ते प्रतीक्षा यादीतील कुटुंबांना देण्याचे आदेश जारी केले आहेत.

मृत व्यक्तींच्या नावे शिधापत्रिका?

कार्ड तपासणीदरम्यान मृत व्यक्तींची नावे अद्याप शिधापत्रिकांवर असल्याचे समोर आले. या प्रकरणांमध्ये, मृत्यू दाखले प्राप्त झाल्यानंतर ती नावे रेशन यादीतून हटवली जात नाहीत, हे लक्षात येताच संबंधित यंत्रणांना सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाचा सकारात्मक परिणाम

या निर्णयामुळे आता

अनेक प्रतीक्षेत असलेल्या गरजूंना शिधापत्रिका मिळू शकणार आहेत.

धान्यवाटप अधिक पारदर्शक आणि गरजूंनाच केंद्रित होणार आहे.

शासकीय योजनांचा अपव्यय रोखण्यात मदत होणार आहे.

तुमचं रेशन कार्ड अद्याप वैध आहे का?

जर तुम्ही सातत्याने धान्य घेत असाल तर चिंता करण्याची गरज नाही. मात्र, रेशन कार्ड वापरणे टाळल्यास ते निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Tata Tiago EV या कारवर घसघशीत 1.65 लाखांची सूट, वाचा फिचर आणि किंमत, Year End Offer
बाबो, लई भारी! सॅलरी स्लिपशिवाय मिळवा Personal Loan, तेही तासाभरात मंजुरी!