वडील आणि मुलगा दोघांनाही PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो का?

भारत सरकार देशभरातील करोडो शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देत आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी गरीब शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते.

Rameshwar Gavhane | Published : May 14, 2024 11:57 AM IST

भारत सरकार देशभरातील करोडो शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देत आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी गरीब शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. 6 हजार रुपयांची ही आर्थिक मदत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रत्येक हप्त्याअंतर्गत गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये पाठवले जातात. प्रत्येक हप्ता 4 महिन्यांच्या अंतराने सोडला जातो. भारत सरकारने आतापर्यंत एकूण 16 हप्ते जारी केले आहेत. अलीकडेच, महाराष्ट्रात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेचा 16 वा हप्ता जारी केला होता. एका कुटुंबातील वडील आणि मुलगा दोघांनाही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकतो का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एका सदस्याला मिळतो. एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कुटुंबातील वडील आणि मुलगा एकत्र PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावावर जमिनीची नोंद आहे, त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो. देशातील अनेक लोक या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. या कारणास्तव सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी करणे अनिवार्य केले आहे.

जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी ही दोन्ही महत्त्वाची कामे लवकरात लवकर पूर्ण करा. ही दोन्ही महत्त्वाची कामे पूर्ण न केल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी करुन पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

Share this article