केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतेच जाहीर केले की, २६ सप्टेंबर २०२५ रोजी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये २१व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. विशेषतः पूरग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
आता पुढील टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि इतर उर्वरित राज्यांतील लाभार्थ्यांना देखील लवकरच हप्ता वितरित केला जाईल, अशी माहिती आहे.