सध्या राज्यात कृषी यांत्रिकीकरणासाठी खालील तीन प्रमुख योजना राबवल्या जात आहेत.
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना (DPR Based) कृषी यांत्रिकीकरण योजना
या सर्व योजना महा डीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे चालवल्या जात आहेत. यामधून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
२०२५-२६ या वर्षासाठी लाभार्थ्यांची निवड “प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सर्वात आधी अर्ज सादर केले, त्यांना प्राधान्याने अनुदान मिळणार आहे.