Kitchen Tips: रोज चपाती किंवा पोळी बनवूनही अनेकांना ती मऊ लुसलुशीत बनवता येत नाही. कधी चपात्या कडक होतात, तर कधी लाटताना पोळपाटाला चिकटतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे पीठ मळताना होणाऱ्या चुका. या चुका कशा टाळाव्यात जाणून घ्या….
चपाती किंवा पोळी हा भारतीयांच्या सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ आहे. पण मऊ आणि टम्म फुगलेल्या पोळ्या बनवणं हे सर्वांनाच जमतं असं नाही. यासाठी पीठ मळण्याची पद्धत खूप महत्त्वाची ठरते.
25
चपातीसाठी किती पाणी वापरावे
चपातीसाठी लागणारं पाणी नेहमी पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. साधारणपणे, 2 कप गव्हाच्या पिठासाठी सुमारे 1 कपापेक्षा थोडं कमी पाणी लागतं. म्हणजे पीठ आणि पाण्याचं प्रमाण 2:1 असं हवं. पीठ थोडं जाडसर असेल, तर ते जास्त पाणी शोषून घेतं. तेव्हा थोडं जास्त पाणी लागू शकतं.
35
साधं पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा
चपात्या जास्त वेळ मऊ राहाव्यात असं वाटत असेल, तर साधं पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा. यामुळे पिठातील प्रोटीन सक्रिय होतं आणि पीठ जास्त मऊ होतं.
कधीकधी चपात्या लवकर कोरड्या पडतात. अशावेळी कोमट पाणी उत्तम काम करतं. पण तुम्हाला अजून मऊ आणि पांढरेशुभ्र चपात्या हव्या असतील, तर पाण्याऐवजी दुधाने पीठ मळू शकता. यामुळे चपातीला एक क्रीमी चव येते.
55
पीठ मळल्यानंतर ते 15-20 मिनिटं झाकून ठेवा
बरेच जण पीठ मळल्याबरोबर लगेच चपात्या लाटायला घेतात. पण चांगल्या चपात्यांसाठी, पीठ मळल्यानंतर ते एका कापडाने किंवा ताटाने झाकून १५-२० मिनिटं तसंच ठेवा. यानंतर केलेल्या चपात्या छान मऊ होतात.