Investment tips : कष्टाने कमावलेला पैसा कुठे गुंतवायचा याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो. पण, कोणताही धोका नसलेली आणि खात्रीशीर परतावा देणारी एक उत्तम गुंतवणूक योजना म्हणजे किसान विकास पत्र (KVP) योजना. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.
किसान विकास पत्र ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक बचत योजना आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. सध्या या योजनेवर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या व्याजदराने गुंतवलेली रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होते. ज्यांना धोका पत्करायचा नाही, त्यांच्यासाठी ही एक विश्वासार्ह योजना आहे.
25
किती गुंतवणूक करता येते?
या योजनेत तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची गरज नाही. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. 18 वर्षे पूर्ण झालेला कोणताही भारतीय नागरिक जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडू शकतो. यात एकट्याने किंवा जॉइंट अकाऊंटद्वारेही गुंतवणूक करता येते.
35
मुदतपूर्व पैसे काढण्याची सोय
गुंतवणूक म्हणजे पैसे अडकून पडतील, अशी भीती अनेकांना वाटते. पण KVP योजनेत तसे नाही. गुंतवणुकीच्या तारखेपासून 30 महिन्यांनंतर गरज पडल्यास तुम्ही मुदतपूर्व पैसे काढू शकता. त्यामुळे अचानक खर्च आल्यास गुंतवणूकदारांना कोणतीही अडचण येत नाही.
सध्याच्या 7.5 टक्के व्याजदरानुसार, गुंतवलेली रक्कम 9 वर्षे आणि 7 महिन्यांत दुप्पट होते. उदाहरणार्थ, तुम्ही 5 लाख रुपये गुंतवल्यास, 115 महिन्यांनंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून 10 लाख रुपये मिळतील. बाजारातील जोखमीशिवाय खात्रीशीर उत्पन्न मिळवू शकता.
55
ही योजना कोणासाठी फायदेशीर आहे?
ज्यांना सुरक्षितता, खात्रीशीर परतावा आणि सरकारी हमी हवी आहे, त्यांच्यासाठी किसान विकास पत्र योजना एक योग्य पर्याय आहे. निवृत्तीचे नियोजन, मुलांचे शिक्षण आणि भविष्यातील गरजांसाठी ही योजना खूप उपयुक्त आहे. तसेच, बाजारातील चढ-उतारांशिवाय स्थिर उत्पन्न मिळवता येते.