मुंबई - नारळपाणी दिसायला जरी साधं असलं तरी त्याने अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. एक नारळपाणी म्हणजे एक सलाईन लावल्यासारखे आहे असेही सांगितले जाते. नारळपाणी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले अमृत आहे. जाणून घ्या याचे अनेक फायदे.
नारळपाणी महाग असलं तरी लोक ते आवडीने पितात. काही लोक रोज पितात. पण तुम्ही आठवड्यातून फक्त चार दिवस प्यायल्यास काय होईल? हे ठीक आहे का?
आठवड्यातून ३ ते ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास, मूत्रपिंडाच्या कार्याला आणि पचनाला मदत होते. नारळपाण्यात नैसर्गिकरित्या पोटॅशियम जास्त असतं. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि शारीरिक सूज कमी करण्यास मदत करतं.
23
आहारतज्ज्ञ डी. गुलनाज शेख यांनी सांगितलं....
नारळपाण्यात नैसर्गिकरित्या पोटॅशियम जास्त असतं. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतं. तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटू शकतं. हे स्नायूंच्या आकुंचनापासून आराम मिळवण्यास मदत करतं, असं ठाण्याच्या किम्स हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ज्ञ डी. गुलनाज शेख यांनी सांगितलं.
डॉ. शेख यांच्या मते, आठवड्यातून ३ ते ४ वेळा नारळपाणी पिणे बहुतेक लोकांसाठी पुरेसे आहे. जर तुम्ही घाम गाळणारे काम करत असाल किंवा आजारपणातून बरे होत असाल, तर रोज नारळपाणी प्यायल्याने कमी झालेले इलेक्ट्रोलाइट्स परत मिळवण्यास मदत होते. पण सरासरी निरोगी व्यक्तीसाठी, आठवड्यातून ४ वेळा पिणे पुरेसे आहे.
33
कधी प्यावे नारळपाणी?
बहुतेक लोकांसाठी प्रत्येक वेळी १५० ते २०० मिली पुरेसे आहे. हे एका मध्यम आकाराच्या नारळात असलेल्या पाण्याच्या प्रमाणाइतके आहे. तुम्हाला जास्त पिण्याची गरज नाही, जास्त प्यायल्याने ते चांगले आहे असं होत नाही, असं शेख म्हणाल्या.
नारळपाणी सकाळी किंवा व्यायामानंतर पिणे चांगले. हे पोटासाठी चांगले आहे. हायड्रेटेड राहण्यास मदत करते. जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर रात्री उशिरा नारळपाणी पिणे टाळा, असं शेख यांनी सांगितलं.