२६ ऑक्टोबरपासून, एअर इंडिया राजस्थानच्या अनेक भागांसाठी हंगामी विमानसेवा सुरू करत आहे.
दिल्ली - जयपूर आणि दिल्ली - जैसलमेर हे दोन नवीन मार्ग जोडले गेले आहेत.
दिल्ली - उदयपूर, मुंबई - जयपूर, मुंबई - उदयपूर आणि मुंबई - जोधपूर या मार्गांवर अतिरिक्त विमानसेवा चालवली जाईल.
मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांसाठी अतिरिक्त विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
मुंबई आणि दिल्लीहून मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदूर शहरांसाठी अतिरिक्त विमानसेवा असेल.
त्याचप्रमाणे, मुंबई आणि दिल्लीहून गुजरातमधील भुज आणि राजकोट शहरांसाठी अतिरिक्त विमानसेवा चालवली जाईल.
याशिवाय, दिल्ली - वाराणसी, दिल्ली - रायपूर, दिल्ली - पोर्ट ब्लेअर, दिल्ली - छ. संभाजीनगर, दिल्ली - गुवाहाटी, दिल्ली - नागपूर, मुंबई - देहरादून, मुंबई - पाटणा आणि मुंबई - अमृतसर या मार्गांवरील विमानसेवांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.